government design गरजू रुग्णांसाठी एक आनंदाची बातमी आहे! आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पाच लाखांपेक्षा जास्त खर्च असलेल्या नऊ दुर्धर आणि दुर्मिळ आजारांवर उपचार घेण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे. राज्य सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे अनेक गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या गरीब आणि गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सरकारी रुग्णालयांचे सक्षमीकरण आणि राखीव निधीची निर्मिती government design
या निर्णयानुसार, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांच्या उपचारांसाठी मिळणाऱ्या निधीचा एक भाग आता शासकीय रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी आणि गरजू रुग्णांसाठी राखीव निधी म्हणून वापरला जाईल.
राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून शासकीय रुग्णालयांना मिळणाऱ्या निधीपैकी २०% रक्कम आता राखीव निधीत जमा केली जाईल. तर उर्वरित ८०% निधी रुग्णालयांना दिला जाईल, ज्याचा उपयोग ते पुढील कामांसाठी करू शकतील:
- पायाभूत सुविधांसाठी: १९%
- औषधे आणि उपकरणांसाठी: ४०%
- कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन भत्त्यासाठी: २०%
- प्रचार आणि प्रसिद्धीसाठी: १%
या सुधारणेमुळे शासकीय रुग्णालयांची क्षमता वाढेल आणि गरजू रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील.
पाच लाखांवरील खर्चासाठी निधी उपलब्ध
Maharasht आतापर्यंत या योजनेअंतर्गत आरोग्य संरक्षणाची मर्यादा प्रति कुटुंब ५ लाख रुपये होती, ज्यामुळे यकृत, अस्थिमज्जा किंवा फुफ्फुस प्रत्यारोपणासारख्या महागड्या उपचारांचा लाभ घेता येत नव्हता. परंतु आता, राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या राखीव निधीतून अशा नऊ दुर्मिळ आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना आर्थिक मदत केली जाणार आहे.
या योजनेअंतर्गत प्रति रुग्ण मिळणारी संभाव्य मदत:
- हृदय प्रत्यारोपण: १५ लाख रुपये
- फुफ्फुस प्रत्यारोपण: २० लाख रुपये
- यकृत प्रत्यारोपण: २२ लाख रुपये
- अस्थिमज्जा प्रत्यारोपण (विविध प्रकार): ९.५ लाख ते १७ लाख रुपये
- ट्रान्स कॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लांटेशन (TAVI) आणि रिप्लेसमेंट (TMVR): १० लाख रुपये
